Episodes

  • # 1869: "छू SS टॉमी, छूss !" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Oct 7 2025

    Send us a text

    दुपारी मेकॅनिक हॉलमध्ये शिरला.

    सोफ्याजवळ खतरनाक डॉबरमॅन झोपला होता.

    तो बिचकला, पण कुत्र्याने त्याच्याकडे पाहिलं आणि परत डोळे मिटले.

    मेकॅनिक ए.सी. कडे गेला तर तो पोपटाचे सुरु झाले,

    "ए चोरा! काय करतोस रे?".......

    Show More Show Less
    3 mins
  • # 1868: "जग काय म्हणेल?" लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Oct 6 2025

    Send us a text

    खूप मोठं जगावेगळं काही करायची आपल्यात हिम्मत नसते. पण अगदी लहान सहान गोष्टी करायला का लाजायचे ?

    अगदी साधी गोष्ट म्हणजे हॉटेलात हातानी डोसा खाताना सुद्धा..." आसपासचे लोक काय म्हणतील ?"

    यासाठी आपण घाबरतो. काटे चमच्यांनी कसरत करत डोसा खातो. त्यापेक्षा गरम कुरकुरीत डोसा हातानी मस्त खाऊन घ्यायचा.....

    Show More Show Less
    8 mins
  • # 1867: चिन्ह-भाषेचा अर्थ-अनर्थ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Oct 5 2025

    Send us a text

    परवा असंच झालं, सौम्याच्या शाळेच्या ग्रुपवर एका प्रोजेक्टच्या चर्चेत बराच वेळ गोंधळ चालला होता. अगदी भांडणंच म्हणा ना! कारण होतं की चर्चा करताना काहीजण न वाचता भराभर फक्त अंगठ्याचे इमोजी टाकत होते, तर काहीजण वेगवेगळे चेहरे! पण त्यावरून प्रोजेक्टमध्ये कोणते मुद्दे घ्यायचे, कोणते नाही, हे कळतंच नव्हतं. चर्चा होतच नव्हती. पुन्हा पुन्हा विचारलं तरी कुणीही आपलं मत शब्दांत सविस्तर लिहून मांडत नव्हतं. शेवटी सौम्याने सर्व मुद्दे एकत्र करून गटावर टाकले, तरी परत काहीजण अंगठे टाकून मान्य आहे सांगत होते, तर काहीजण मान्य नसल्याचे वाईट चेहरे. शेवटी तिघा-चौघांनी एकमेकांशी बोलून प्रोजेक्टचा मजकूर नक्की केला. या चर्चेत फक्त इमोजी टाकणाऱ्यांचं मत शेवटपर्यंत समजलं नाही ते नाहीच.

    Show More Show Less
    8 mins
  • # 1866: औषधांच्या गोळीला कसं कळतं? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Oct 4 2025

    Send us a text

    गोळी म्हणजे केवळ एक गाठोडं असतं, औषधाच्या इवल्याइवल्या कणांचं. तसली बहुतेक गाठोडी जठरात (stomach) सुटतात. काही औषधांना जठरातलं अॅसिड सोसत नाही. म्हणून त्यांची गाठोडी लहान आतड्यात (small intestine) पोचल्यावरच सुटावी अशा बेताने बांधलेली असतात. काही गाठोड्यांतले कप्पे टप्प्याटप्प्याने उघडतात आणि एकामागोमाग एक वेगवेगळी औषधं वेगवेगळ्या वेळी, काही जठरात, काही लहान आतड्यात तर काही मोठ्या आतड्यात अशी मोकळी सोडतात. तशा नेमक्या जागी नेमकं औषध पोचवायच्या पद्धतीला targeted drug delivery म्हणतात.

    Show More Show Less
    9 mins
  • # 1865: जाहिरातीतील खाचाखोचा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Oct 3 2025

    Send us a text

    जाहिरातीत जर जीवाला घातक ठरू शकेल अशी एखादी कृती दाखवली असेल तर त्याच वेळी जाहिरातीच्या तळाशी ‘असे कृत्य करू नये. त्यामुळे अपघात होऊ शकतात’, असे दाखवणे जरुरीचे आहे. कोणीतरी सेलिब्रिटी उंचावरून उडी घेतोय, किंवा कशाचीही मदत न घेता उंचावर चढतोय वगैरे साहसी दृश्ये सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीत हमखास आढळतात. त्या साहसी दृश्यात काम करणारे सेलिब्रिटी नसतात, तर ते त्यांचे डुप्लिकेट असतात. त्यांना विशेष ट्रेनिंग मिळालेले असते. काही स्टंट कॉम्प्युटरच्या मदतीने केलेले असतात.

    Show More Show Less
    7 mins
  • # 1864: "देव कधीही हिशोब मागू शकतो" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Oct 2 2025

    Send us a text

    एक महिला दुकानात आली आणि म्हणाली, "सेठ, तुमचे दहा रुपये घ्या... !"

    "तुम्ही "७ किलोमीटर अंतरावरून दुसऱ्यांदा आला आहात, मला हे दहा रुपये देण्यासाठी?" त्या महिलेने सहज उत्तर दिले, "हो, मी दुसऱ्यांदा आले आहे. मनःशांतीसाठी हे करावेच लागले.

    माझा नवरा आता या जगात नाही, पण त्याने मला एक गोष्ट शिकवली आहे, "दुसऱ्याच्या मालकीचा एक पैसाही खाऊ नका. कारण देव कधीही हिशोब मागू शकतो. आणि आपल्या मुलांनाही त्या हिशोबाची शिक्षा होऊ शकते."

    Show More Show Less
    6 mins
  • #1863: "जिथे फक्त ‘वाटणं‘ संपून ‘वाटून घेणं‘ सुरू झालय". लेखक :अज्ञात. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) )
    Oct 1 2025

    Send us a text

    लग्नाला पस्तीस वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ...

    "तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"

    तो बावचळला ...गोंधळला ...

    आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !

    बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं...

    हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ...

    लाईन लागेल नवऱ्यांची ...

    त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..!

    Show More Show Less
    5 mins
  • #1862: "पुस की रात" लेखक प्रेमचंद. तळटिपा : आसाराम लोमटे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Sep 30 2025

    Send us a text

    "तुम्ही इथे आमराईत जाळ करून झोपून राहिलात आणि तिकडे सगळ्या पिकाचा सत्यनाश झालाय." असं म्हणत मुन्नी नवऱ्याला जागं करते.

    हलकू आणि त्याची बायको शेताची झालेली दशा पाहतात. बायको चिंतित झालेली असते पण हलकूच्या चेहऱ्यावर मात्र समाधान असतं.

    बायको म्हणते, "आता मजुरी करून मालगुजारी भरावी लागेल." हलकू अतिशय आनंदाने म्हणतो, "गेलं तर जाऊदे पीक. रात्री मरणाच्या थंडीत इथं येऊन कुडकुडत तर पडावं लागणार नाही ना आता."

    शेतातलं पीक उद्ध्वस्त झाल्यावर अन्य लेखकाच्या कथेत शेतकऱ्याने आक्रोश केला असता, पण हा म्हणतोय, 'मरण्यातनांतून तरी सुटका झाली'! भारतीय शेतकऱ्याचं जिवंत चित्र प्रेमचंद यांनी 'पुस की रात' मधे रेखाटले आहे.

    Show More Show Less
    7 mins